स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे!
स्वामी स्वरूपानंदांसारख्या सत्पुरुषाच्या नावाने स्थापन झालेली ही संस्था आर्थिक क्षेत्रात
विश्वासार्ह, अग्रनामांकीत पतसंस्था म्हणून जनमान्यता प्राप्त करती झाली. सन २०१२ मध्ये
महाराष्ट्र शासनाने घोषित केलेला "सहकारभूषण" हा पुरस्कार संस्थेला प्राप्त झाला व सन २०२३ मध्ये भारत सरकार अंगीकृत राष्ट्रीय सहकार विकास निगमचा "एक्सलन्स अवॉर्ड" प्राप्त झाला आणि
जनमान्यतेबरोबर राज्यमान्यताही प्राप्त झाली.
३४ वर्ष अविरतपणे सातत्यपूर्ण, उत्तम आणि वृद्धींगत होणारी कामगिरी संस्थेने केली
आहे. आर्थिक क्षेत्रात कमालीची स्पर्धात्मक परिस्थिती असूनही शिस्तबद्ध, वक्तशीर,
पारदर्शकआर्थिक व्यवहार करत संस्थेने विश्वासार्हता प्राप्त केली आणि सहकार क्षेत्रात नवीन
उदाहरण निश्चित केले. स्वाभाविकपणे मोठा ग्राहकवर्ग संस्थेकडे आकृष्ट झाला.
रत्नागिरी तालुका कार्यक्षेत्रात वाढ होऊन महाराष्ट्र राज्यझाले. १७ शाखांचा विस्तार झाला. स्वामी स्वरूपानंदांच्या पुण्यभूमी पावस मध्ये संस्थेने पहिली शाखा सुरु केली आणि
पाहता पाहता १७ शाखांचा कार्य विस्तार झाला. आर्थिक शिस्त, विश्वासार्हता व वसुलीसाठी
जागरुक, प्रसंगी कठोर धोरणे यामुळे संस्थेची विश्वासार्हता अधोरेखित होत गेली. प्रारंभी केवळ
१० हजार भांडवलावर कै.आमदार
डॉ.तात्यासाहेब नातू यांच्या प्रेरणेतून ही संस्था स्थापन केली. संस्थेची स्थापना सद्हेतूने
आणि सत्पुरुषाचे अधिष्ठान घेऊन झाली असल्याने संस्थेचे अर्थकारण द्रुतगतीने वृद्धिंगत
झाले संस्थेच्या भांडवलात, ठेवींमध्ये, कर्जवितरणामध्ये, गुंतवणुकीमध्ये फार मोठी वाढ झालेली
दिसत आहे. झालेली ही वाढ सातत्यपूर्ण आहे हे नमूद करणे आर्थिक औचित्याला धरून आहे.
संस्थेच्या स्थापनेपासून या संस्थेच्या प्रत्येक श्वासाचा जागता साक्षीदार म्हणून काम
करता आले हमी माझे भाग्य समजतो. व्रतस्थ भूमिकेतून आयुष्यातील भरपूर वेळ या
संस्थेसाठी जाणीवपूर्वक दिला. सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी मिळालेली ही संधी घेऊन
उत्तम आर्थिक पतदार संस्था साकारता आली. सर्व सहका-यांचे उत्तम सहकार्य मिळाले आणि
संघभावनेतून संस्थेचे विस्तीर्ण स्वरूप साकार झाले.
संस्थेच्या स्थापने पासून सातत्याने लेखापरीक्षणात संस्थेने 'अ' श्रेणी सोडली नाही. सतत
३४ वर्षे जवळजवळ शतप्रतिशत वसुली हा सहकार क्षेत्रातला विक्रम म्हणावा लागेल. उपलब्ध
निधी योग्य पद्धतीने वक्तशीरपणे विनियोगात आल्याने संस्थेला योग्य परतावा प्राप्त
होण्यात अडचण आली नाही आणि संस्थेचा नफा सातत्याने वाढता राहीला. वाढीव नफ्याचा
विनियोग संस्थेने मालमत्ता निर्मितीसाठी केला आणि संस्थेचे रत्नागिरीचे मध्यवर्ती परिसरात
२७०० चौ. फुटाचे स्वमालकीचे कार्यालय उभे राहिले. लकरच मुख्य कार्यालय पाचमजली अश्या सुसज्ज कार्यालयात स्थलांतरित होईल.सदर मुख्य शाखेसह सध्या ८ शाखा
स्वमालकीचे जागेतकार्यरत आहेत. सर्वच शाखा स्वमालकीचे जागेत कार्यरत होणेसाठी
प्रयत्नशील आहोत. मालमत्तानिर्मिती बरोबरच नफ्यातील मोठा भाग परत व्यवसायामध्ये
वापरण्याचेकौशल्य पतसंस्थेने सुरुवातीपासून दाखवले त्यामुळे स्वभांडवलावर मोठा नफा
संस्थेला कमावता आला.
आर्थिक संस्थेची ताकद ही स्वनिधी दर्शवित असतो. आपल्या पतसंस्थेने जाणीवपूर्वक
स्वनिधी वाढेल याकडे लक्ष दिले याचाच प्रत्यय म्हणून आज अखेर ४८ कोटी १३ लाखाचा
स्वनिधी संस्थेने उभा केला.
आर्थिक स्थितीचा विचार करता विक्रमी सातत्यपूर्ण कर्ज वसुली, कर्ज,ठेवी रेशोचे ७०% चे
आदर्श प्रमाण, ४०% च्या घरात असलेली संस्थेची गुंतवणुक, खेळत्या भांडवलाच्या आदर्श
प्रमाणात निव्वळ नफा, ३४६ कोटींच्या पुढे पोचलेल्या ठेवी, आकर्षक तरीही प्रमाणबद्ध
व्याजदर आणि आपलेपणाच्या भावनेतून निर्माण झालेली विश्वासार्हता, २५२ कोटीची कर्जे ही
सर्व आकडेवारी स्वयंस्पष्ट आहे.
कोणत्याही आर्थिक संस्थेला आदर्श ठरावी अशी अभिमान वाटावी अशी आर्थिक स्थिती
संस्थेने प्रारंभापासून राखली आहे.
१९ पिग्मी एजंटांचे माध्यमातून शहरी भागाप्रमाणे खेड्यापाड्यात राबवलेली यशस्वी
पिग्मी योजना हेही संस्थेचे बलस्थान आहे.
आर्थिक आढावा घेत नवनवीन धोरणे, योजना सर्वदूर पोहोचण्यासाठी प्रसारमाध्यमांचा
उपयोग आणि उपक्रमशीलता या मुळे संस्थेचे लोकमानसात एक स्पष्ट स्थान निर्माण झाले.
संस्थेची ओळख निर्माण झाली. संस्थेचा अधिकारी, सेवक वर्ग १०० च्या घरात आहे. संचालक
मंडळ, अधिकारी, कर्मचारी वर्ग यांचा उत्तम ताळमेळ यामुळे संस्थेच्या कामकाजात गतिमानता
राहिली आहे.
आर्थिक शिस्त आणि वस्तुस्थितीदर्शक माहिती संकलित करून आणि भविष्याचा वेध
घेऊन घेतलेले निर्णय यामुळे आजपर्यंत संस्था अग्रस्थानी राहिली. हे अग्रस्थान अबाधित
ठेवण्यासाठी सतत जागरूक राहणे महत्त्वाचे आहे याचे भान आम्ही ठेवले आहे.
सन २०१२ मध्ये संस्थेला राज्य शासनाने गौरवले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात
'सहकारभूषण' पुरस्कार प्राप्त करणे ही बाब लाखमोलाची वाटते. रत्नागिरी सारख्या सहकार
क्षेत्रात फार नाव नसलेल्या जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील कामाला सहकार भूषण प्राप्त होते
हि फार मोठी बाब होती. या पुरस्कारातून प्रेरणा घेऊन अधिक पुढचे शिखर गाठण्यासाठी
संस्था मार्गस्थ झाली आहे.
३४ वर्षाच्या या अथक प्रवासात गेली २३ वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले. मी व
आजवरचे माझे सर्व सहकारी संचालक यांनी कोणताही आर्थिक लाभ न घेता काम केले आहे.
व्रतस्थ भूमिकेतून नवीन विश्वासार्ह काम उभे झाले, जनमान्यता प्राप्त झाली, राज्यमान्यता
प्राप्त झाली आणि लाखमोलाचा विश्वास संपादन झाला यापेक्षा अधिक मोबदला असू शकत
नाही. युवा असताना आर्थिक क्षेत्रात निर्णय घेण्याचे आव्हान पेलता आले. अचूक निर्णय घेत
फार कोणाचा आधार नसताना केलेली वाटचाल स्वप्नवत वाटते तेवढीच कृतार्थ वाटते.
माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात या साईटच्या सुरुवातीला माझे मनोगत व्यक्त
करतानाच खूप लिहीण्यासारख आहे. ३४ वर्षातला क्षणक्षण नजरेसमोर तरळत आहे हि
वाटचाल स्वप्नवत आहे आर्थिक शिस्त कटाक्षाने जपून अर्थकारण सातत्याने पुढे नेणे आणि
सातत्याने ते अग्रस्थानी ठेवणे हे सहजसाध्य नाही पण स्वरूपानंदांच्या कृपेने हे घडले.
आमच्या शाखा
Architektura https://vincispincasinopl.com jasno skierowana jest do graczy oczekujących czegoś więcej niż tylko kilku gier. Bonusy no-deposit pozwalają wypróbować platformę bez ryzyka finansowego. Wrażliwe działania jak wypłaty wymagają dodatkowych kroków potwierdzania. Live Baccarat występuje w różnych wariantach, jak Speed Baccarat czy Squeeze. Nawigacja jest jasno ustrukturyzowana i umożliwia szybkie znajdowanie pożądanych treści. Gry mobilne zostały przez deweloperów specjalnie zoptymalizowane pod sterowanie dotykowe. Podział na kategorie tematyczne ułatwia szybkie znalezienie właściwej gry. Konkursy strategiczne skierowane są do doświadczonych graczy gier stołowych i live. Polskojęzyczni pracownicy wsparcia sprawiają, że bariery językowe nie odgrywają żadnej roli. Kombinacja różnorodności gier, ofert bonusowych i serwisu sprawia, że oferta jest szczególnie atrakcyjna.
- एस.टी. स्टॅड समोर, रत्नागिरी
- पावस, रत्नागिरी
- जाकादेवी, रत्नागिरी
- कुवारबाव, रत्नागिरी
- खंडाळा, रत्नागिरी
- चिपळूण, रत्नागिरी
- मारुती मंदिर, रत्नागिरी
- राजापूर, रत्नागिरी
- CLOUD SERVER TECHNOLOGY(AWS) वर आधारीत कोअर बँकींग प्रणालीयुक्त आर्थिक व्यवहार सर्व शाखांशी संलग्न
- जलद RTGS / NEFT सेवा उपलब्ध
- २१ एजंटच्या माध्यमातून दररोज रु.६ लाख पिग्मी जमा
- एकूण वसुली सतत ५ वर्षे ९९% चे वर
- सातत्याने ३२ वर्ष ऑडीट वर्ग "अ"
- सामाजिक बांधीलकीमध्ये अग्रेसर
- स्थापनेपासून नफ्यामध्ये
- SMS सुविधा उपलब्ध
- मोबाईल पिग्मी कलेक्शन ॲप


