आर्थिक स्थिती - ३० एप्रिल २०२६ पर्यंत
स्वामी स्वरूपानंदांसारख्या सत्पुरुषाच्या नावाने स्थापन झालेली ही संस्था आर्थिक क्षेत्रातविश्वासार्ह, अग्रनामांकीत पतसंस्था म्हणून जनमान्यता प्राप्त करती झाली. सन २०१२ मध्येमहाराष्ट्र शासनाने घोषित केलेला "सहकारभूषण" हा पुरस्कार संस्थेला प्राप्त झाला व सन २०२३ मध्ये भारत सरकार अंगीकृत राष्ट्रीय सहकार विकास निगमचा "एक्सलन्स अवॉर्ड" प्राप्त झाला आणिजनमान्यतेबरोबर राज्यमान्यताही प्राप्त झाली.
३४ वर्ष अविरतपणे सातत्यपूर्ण, उत्तम आणि वृद्धींगत होणारी कामगिरी संस्थेने केलीआहे. आर्थिक क्षेत्रात कमालीची स्पर्धात्मक परिस्थिती असूनही शिस्तबद्ध, वक्तशीर,पारदर्शकआर्थिक व्यवहार करत संस्थेने विश्वासार्हता प्राप्त केली आणि सहकार क्षेत्रात नवीनउदाहरण निश्चित केले. स्वाभाविकपणे मोठा ग्राहकवर्ग संस्थेकडे आकृष्ट झाला.
रत्नागिरी तालुका कार्यक्षेत्रात वाढ होऊन महाराष्ट्र राज्यझाले. १७ शाखांचा विस्तार झाला. स्वामी स्वरूपानंदांच्या पुण्यभूमी पावस मध्ये संस्थेने पहिली शाखा सुरु केली आणिपाहता पाहता १७ शाखांचा कार्य विस्तार झाला. आर्थिक शिस्त, विश्वासार्हता व वसुलीसाठीजागरुक, प्रसंगी कठोर धोरणे यामुळे संस्थेची विश्वासार्हता अधोरेखित होत गेली. प्रारंभी केवळ१० हजार भांडवलावर कै.आमदारडॉ.तात्यासाहेब नातू यांच्या प्रेरणेतून ही संस्था स्थापन केली. संस्थेची स्थापना सद्हेतूनेआणि सत्पुरुषाचे अधिष्ठान घेऊन झाली असल्याने संस्थेचे अर्थकारण द्रुतगतीने वृद्धिंगतझाले संस्थेच्या भांडवलात, ठेवींमध्ये, कर्जवितरणामध्ये, गुंतवणुकीमध्ये फार मोठी वाढ झालेलीदिसत आहे. झालेली ही वाढ सातत्यपूर्ण आहे हे नमूद करणे आर्थिक औचित्याला धरून आहे.
संस्थेच्या स्थापनेपासून या संस्थेच्या प्रत्येक श्वासाचा जागता साक्षीदार म्हणून कामकरता आले हमी माझे भाग्य समजतो. व्रतस्थ भूमिकेतून आयुष्यातील भरपूर वेळ यासंस्थेसाठी जाणीवपूर्वक दिला. सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी मिळालेली ही संधी घेऊनउत्तम आर्थिक पतदार संस्था साकारता आली. सर्व सहका-यांचे उत्तम सहकार्य मिळाले आणिसंघभावनेतून संस्थेचे विस्तीर्ण स्वरूप साकार झाले.
संस्थेच्या स्थापने पासून सातत्याने लेखापरीक्षणात संस्थेने 'अ' श्रेणी सोडली नाही. सतत३४ वर्षे जवळजवळ शतप्रतिशत वसुली हा सहकार क्षेत्रातला विक्रम म्हणावा लागेल. उपलब्धनिधी योग्य पद्धतीने वक्तशीरपणे विनियोगात आल्याने संस्थेला योग्य परतावा प्राप्तहोण्यात अडचण आली नाही आणि संस्थेचा नफा सातत्याने वाढता राहीला. वाढीव नफ्याचाविनियोग संस्थेने मालमत्ता निर्मितीसाठी केला आणि संस्थेचे रत्नागिरीचे मध्यवर्ती परिसरात२७०० चौ. फुटाचे स्वमालकीचे कार्यालय उभे राहिले.
राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा सहकार भूषण पुरस्कार तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन् , राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा सहकार भूषण पुरस्कार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते स्विकारताना
NCDC च्या संचालकांच्या हस्ते उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्राप्त करताना
राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा दीपस्तंभ पुरस्कार ना. उदय सामंत यांच्या हस्ते स्वीकारताना सोबत राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे व अन्य अधिकारी
संस्थाध्यक्ष संदेश
ॲड. दीपक पटवर्धन
सस्नेह नमस्कार,
हिंदुस्थानने आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच उत्साहाने आणि राष्ट्रभावनेने साजराकेला. आता शतक महोत्सवाकडे नेणारा कालखंड सुरू आहे. या कालखंडाला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजीमोदी यांनी अमृत काळ संबोधले आहे. देशाचा सर्वांगीण विकास होऊन हिंदुस्थान संपूर्ण विकसित राष्ट्रम्हणून जगतासमोर याव ही वाटचाल करणारा हा अमृतकाळ आहे. त्यामुळे “सबका साथ सबकाविकास” हा मंत्र अमलात आणण्याचा व सामर्थ्यशाली विकसित हिंदुस्थान निर्मितीमध्ये आपल्या सर्वघटकांचा सहयोग देण्यासाठी सज्ज होण्याचा संकल्प करू या.
सहकार जगताच्या संधी वाढत आहेत. नवनवीन संकल्पना, नव तंत्रज्ञान या माध्यमातून सहकारीपतसंस्था चळवळ अधिक सामर्थ्यशाली होत आहे. कोरोनाच्या अत्यंत भयानक आणि विपरीतस्थितीतही पतसंस्था चळवळीने संपूर्ण विश्व लॉक डाऊन मधून जात असतानाही आपल्याखेडोपाड्यातील ग्राहकांना आवश्यक आर्थिक सेवा दिल्या. गेल्या दोन वर्षात आपल्या स्वामी स्वरूपानंदपतसंस्थेने अविरत आर्थिक सेवा देऊन पतसंस्था व्यवस्थेची उपयुक्तता अधोरेखित केली. आर्थिक चक्रठप्प करणारा कोरोना महामारीचा कालखंड सर्वांचीच परीक्षा पाहणारा कालखंड होता. मात्र स्वामीस्वरूपानंद पतसंस्थेने आपले अर्थचक्र गतिमान रहावे म्हणून हरसंभव प्रयत्न केले आणि ते प्रयत्नयशस्वी झाले. विविध सेवा पुरवत आवश्यक तेथे धोरणात्मक निर्णय घेऊन कर्जदार, ठेवीदार यांचे हितजोपासले. कर्जदारांना उचित मुदत कर्ज फेडण्यासाठी देतानाच कर्ज वसुली ठप्प होणार नाही याचीकाळजी घेतली. आपल्या नफ्यातून कर्जदारांच्या कर्जावरील एक महिन्याचे व्याज संस्थेने भरले.
आमच्या ग्राहकांच्या खंबीर पाठिंब्यामुळे संस्था ही अतुलनीय कामगिरी करू शकली.
जनसंचय आणि धनसंचय यांची सांगड घालणारी स्वरूपानंद पतसंस्था समाजाभिमुख कार्याच्या मार्गावर पुढे जात आहे. संस्थेचा विस्तार अधिक व्यापक व्हावा, या हेतूने 'स्वरूप सहकार' या मुखपत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रभर संस्था पोहोचावी, अशी अपेक्षा आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची पावस शाखा सोमवारी नव्या स्ववास्तूत स्थलांतरित झाली. या सोहळ्यास पावस दशक्रोशीतील पाचशे ग्राहकांनी शाखेला भेट देऊन पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन तसेच संचालक, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. उद्घाटन ॲड. पटवर्धन यांनी केले. याप्रसंगी उपाध्यक्ष माधव गोगटे, गोळपच्या सरपंच मिताली भाटकर, उद्योजक विजय देसाई...
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे भूमीपूजन नुकतेच राज्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमात संस्थेच्या भावी विकास योजना आणि सामाजिक उपक्रमांविषयी सकारात्मक चर्चा घडून आली.


